
अहमदनगर- दिवाळी सणासाठी पुणे येथून घरी घेत असलेल्या तरूणाचा अपघाती मृत्यू झाला आहे. सागर भाऊसाहेब आमले (वय-२६) असे मृत तरूणाचे नाव आहे.
तो दिवाळी सणासाठी पुणे येथून संगमनेर तालुक्यातील आमलेवाडी येथील आपल्या घरी येत होता. हा अपघात नाशिक-पुणे महामार्गावर बोटा बायपास जवळ शनिवारी (२२ ऑक्टोबर) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडला.
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील आमलेवाडी येथील सागर आमले हा तरुण चाकण येथे नोकरीला होता. शनिवारी दिवाळी निमित्त मूळगावी येत असताना बोटा बायपास येथे मोठ्या प्रमाणात पाडलेल्या खड्याच्या अंदाज न आल्याने खड्यात दुचाकी आदळून त्याचा अपघात झाला.
अपघात इतका भयानक होता की त्याच्या डोक्यात हेल्मेट असूनही डोक्याला गंभीर विजा झाली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. पुढील तपास घारगाव पोलीस करत आहे.