मुंबई : मागील वर्षी 21 ऑक्टोबर पासून एसटी कर्मचार्यांनी संप सुरू केला होता त्यामुळे प्रवाश्यांचे होणारे हाल व महामंडळला होणारा तोटा व एसटी कर्मचार्यांचा संप चिरडन्यासाठी एसटी महामंडळाने ८०० चालकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली होती.
एप्रिलमध्ये 2022 मध्ये संप मिटल्यावर एसटीचे कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले. संपातील सर्व कर्मचारी पुन्हा रुजू झाल्यावर आणि राज्यातील वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर कंत्राटी चालकांचे काम थांबवण्यात येणार होते, याची पूर्वकल्पना संबंधित कंत्राटी चालकांना देण्यात आलेली होती.
याबबात आता एसटी महामंडळाने 3 सप्टेंबर पासून कंत्राटी चालकांचा वापर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता कंत्राटी चालकांची सेवा थांबवण्यात आलेली आहे, असे एसटीतील अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गणेशोत्सवानिमित्त राज्यात उत्साहाचे वातावरण असताना, एसटी महामंडळातील ८०० चालकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. आज, शनिवारपासून कंत्राटी चालकांची सेवा बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. यासाठी महामंडळाकडून चालकांचा वापर कमी होत असल्याचे कारण देण्यात आले आहे.