Atuvrushti Nuksan Bharpai अतिवृष्टी नुकसान भरपाई
अतिवृष्टी (Ativrushti Nuksan Bharpai) व परतीच्या पावसामुळे राज्यातील अनेक शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याबाबत राज्य शासनाकडून शेतकर्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे नुकसान पंचनामे करून मदत देण्याची घोषणा राज्य शासना कडून करण्यात आली होती परंतु मदत मिळण्यासाठी तुम्ही तुमच्या पिकाची ई पीक पाहणी केलेली पाहिजे होती परंतु आता ई पीक पाहणी ची अट शिथिल करण्यात आली आहे.
का शिथिल करण्यात आली ई पीक पाहणी (E Peek Pahani) ची अट ?
शेवगाव जि. अहमदनगर येथे अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करताना राज्याचे महसुल मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishn Vikhe Patil) यांनी ज्या शेतकर्यांनी ई पीक पाहणी केली नाही ते मदतीपासून वंचित राहू नये म्हणून सरसकट मदत मिळणार ही घोषणा केली आहे.

शेतकऱ्यांसाठी दिलासा अतिवृष्टी (Ativrushti Nuksan Bharpai) मदत 2022 सरसकट मिळणार
पिक विमा संदर्भात लवकरच सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात येईल तसेच लवकरात लवकर शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देण्यात येईल असे देखील मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवानी ई पिक पाहणी केली नसेल त्यांना आता दिलासा मिळालेला आहे. जरी पिक नुकसान भरपाईसाठी हि अट शिथिल करण्यात आली असली तरी शेतातील पिकांची ई पिक पाहणी करणे गरजेचे आहे. यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवाना नक्कीच दिलासा मिळेल.